शेतकऱ्यांसाठी सोपे बिजोत्पादन
₹50.00 ₹20.00
Description
विज्ञानामुळे मनुष्याची प्रगती होत गेली त्यासोबत गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादनाचे तंत्रज्ञानही प्रगत होत गेले. पूर्वीच्या काळात शेतकरी स्वतःच्या शेतावरील पिकामधून उत्तम ताटे, झाडे, कणसे निवडून या धान्याची वेगळी मळणी करून पुढील वर्षी त्याचा बियाणे म्हणून उपयोग करत होते. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येच्या उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी राज्यात सन १९७१ नंतर मोठ्या प्रमाणात संकरेित ज्वारी, बाजरी व कपाशींचे उत्पादन घेण्यात आले.अशा प्रकारे राज्यात ख-या अर्थाने गुणवत्तापूर्ण बियाण्याच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण झाली.संपूर्ण देशामध्ये गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादन करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने बियाणे कायदा १९६६ व बियाणे नियम १९६८ संपूर्ण देशात लागू कैला. बिंयाणे कायदा १९६६ च्या कलम ८ अंतर्गत ज्या राज्यांना प्रमाणित र्बियाणे उत्पादन करायचे आहे. त्या राज्यांत स्वतंत्र बीज प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्याची तरतूद्ध आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणेची स्थापना करण्यात आली. राज्यात कृषि विभाग, महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृषि विंद्यापीठे, खाजगी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषि विज्ञान मंडळे बीजोत्पादन कार्यक्रम घेतात.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.