Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
-50%

वेडात दौडले वीर मराठे सात…!

200.00 100.00

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

वेडात दौडले वीर मराठे सात….

उमराणीच्या लढाईत प्रतापरावांच्याकडून अभय मिळालेला बेहेलोल खान पुन्हा शिवरायांच्या भूमीत धूमाकूळ घालून उपद्रव करू लागला होता. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असतानाच “बेहेलोल खान पुन्हा-पुन्हा स्वराज्यावर चालून येत आहे. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका’ं अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला. खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्‍त सळसळू लागले. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असणा-या महाराजांचा हुकूम पाळायचा या उेद्‌शाने मनात अनेक उलट-सुलट विचार करत प्रतापराव गुर्जर फक्‍त सहा शिलेदारांसह नेसरी खिंडीत शेकडो सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बेहेलोल खानाच्या सैन्यांवर तुटून पडले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. मंगळवार ता. 24 फेब्रुवारी 1674 ला सात मर्दांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती देवून नेसरी खिंड पावन केली. प्रतापरावांच्या पराक्रमावर कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले “वेडात मराठे वीर दौडले सात” हे गीत आज देखील कानी पडताच अंगातील रक्‍त संचारते. आणि प्रतापरावांचा इतिहास जीवंत होतो.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart